Search This Blog

Tuesday, 11 March 2025

12 मार्च रोजी शहीद बाबुराव शेडमाके जयंती उत्सव व आदिवासी मेळावा

 

12 मार्च रोजी शहीद बाबुराव शेडमाके जयंती उत्सव व आदिवासी मेळावा

Ø सिकलसेल व दंत तपासणी शिबिराचेही आयोजन

चंद्रपूर, दि. 11 मार्च : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर द्वारे 12 मार्च रोजी सकाळी 11 वाजता क्रांतीवीर शहीद बाबुराव शेडमाके जयंती उत्सव व भव्य आदिवासी मेळाव्याचे आयोजन शहीद भूमी स्मारक, जिल्हा कारागृह परिसर, गिरनार चौक चंद्रपूर येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके उपस्थित राहणार आहेत. याशिवाय जिल्ह्यातील इतरही लोकप्रतिनिधी सदर कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

कार्यक्रमाच्या स्थळी सिकलसेल व दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर शिबीर हे सर्वांसाठी खुले राहणार आहे. त्यामुळे कोणताही व्यक्ती या शिबिरात तपासणी करू शकतो. तसेच 09 ऑगस्ट 2024 रोजी आदिवासी दिनानिमित्त आयोजित झाँकी प्रदर्शनामध्ये सहभाग घेतलेल्या प्रकल्पातील शासकीयअनुदानितनामांकित शाळेतील विद्यार्थी व शिक्षक आदींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. सोबतच आदिवासी लाभार्थ्यांना केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनाठक्कर बाप्पा आदिवासी वसतीसुधार योजनेचे प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे.

००००००

लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा

 

लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा

Ø जनसामान्यांपर्यंत माहिती पोहचविण्याच्या सुचना

चंद्रपूर, दि. 11 मार्च : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांना विहित मुदतीत व कालमर्यादेत सेवा देणे आवश्यक आहे. तसेच या  कायद्याविषयी नागरिकांना माहिती होण्यासाठी त्याची व्यापक प्रचार आणि प्रसार मोहीम राबवावी, असे निर्देश राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांनी  दिले.

मुख्य आयुक्त श्रीवास्तव यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जिल्ह्यात अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबत सर्व विभागांचा आढावा घेतला. या बैठकीला राज्य सेवा हक्क आयुक्त नागपूर विभाग अभय यावलकर नागपूर वरून तर  जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.,  मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सननिवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

यावेळी श्रीवास्तव यांनी, आयोगाने विहित केलेल्या नमुन्यात सूचना फलक सर्व कार्यालयात दर्शनी भागात प्रकाशित करावेत. सेवा हक्क कायद्याशी संबंधित माहिती तसेच विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध  सेवांची यादी प्रदान करणारे क्यूआर कोड उपलब्ध करून द्यावेत. तसेच सर्व कार्यालयाची कार्यालय तपासणी आयोगाने दिलेल्या नमुन्यात दरवर्षी करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

आदर्श ‘आपले सरकार सेवा केंद्र’ : जिल्ह्यातील पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयात सर्व सोयीयुक्त आदर्श आपले सरकार सेवा केंद्र उभारण्यात यावे. त्यात  सर्व प्रकारच्या अधिसूचित सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी  मिळणे अपेक्षित आहे. याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पुढाकार घ्यावा.  तसेच स्वंतत्र पोर्टल वापरण्यात येत असलेल्या विभागांनी त्यांच्या सेवा ‘आपले सरकार पोर्टल’ सोबत जोडाव्यात.  सर्व विभागनिहाय सेवांचा आढावा नियंत्रण अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांनी घ्यावा. ठरलेल्या कालावधीत शासनाच्या सेवांचा लाभ नागरिकांना देणे बंधनकारक केले आहे. 

यावेळी ‘आपले सरकार सेवा केंद्र’ उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीवर ही चर्चा झाली. जिल्ह्यात सुरू असलेल्या तसेच बंद असलेल्या सेवा केंद्रांची तपासणी  करून त्यांची कार्यक्षमता वाढवावी. तसेच ज्या ठिकाणी सेवा केंद्र नाहीततिथे नवीन केंद्र स्थापन करावीतअसे निर्देश देण्यात आले.

निःशुल्क नोंदवता येईल अपील तक्रार : नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ वेळेत मिळावा, यासाठी प्रलंबित प्रकरणे विशेष शिबिरे घेऊन निकाली काढावीत. तसेच सेवा केंद्रांवर आणि ग्रामपंचायतींमध्ये तक्रार पेट्या उपलब्ध करून द्याव्यात आणि नागरिकांना तक्रार नोंदवण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीयाची स्पष्ट माहिती देण्यात यावीअसे निर्देश त्यांनी दिले.

तर अधिकाऱ्यांवर कारवाई : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत 90 टक्क्यांपेक्षा कमी प्रकरणे विहित कालमर्यादेत निकाली न काढणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची तरतूद असूनअशा अधिकाऱ्यांवर आवश्यक ती कारवाई करावीअसे निर्देशही देण्यात आले.

००००००

12 मार्च रोजी पालकमंत्री डॉ. उईके चंद्रपुरात

 

12 मार्च रोजी पालकमंत्री डॉ. उईके चंद्रपुरात

चंद्रपूर, दि. 11 मार्च : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

दि. 12 मार्च रोजी सकाळी 10.45 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव, सकाळी 11 वाजता शहीद भुमी स्मारक, जिल्हा कारागृह येथे क्रांतिवीर शहीद बाबुराव शेडमाके जयंती उत्सव व आदिवासी मेळावा कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी सोयीनुसार चंद्रपूर येथून यवतमाळ कडे प्रयाण.

०००००

Monday, 10 March 2025

पालकमंत्री यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया

 


पालकमंत्री यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया

देशाच्या व राज्याच्या विकासचक्राला गती देणारा अर्थसंकल्प : डॉ. अशोक उईके

चंद्रपूर : विकसीत भारत... विकसीत महाराष्ट्रया संकल्पनेवर आधारीत शाश्वत व सर्वसमावेशक विकासाची हमी देणारा तसेच देश व राज्याच्या विकासचक्राला अधिक गती देणारा हा अर्थसंकल्प आहे. यात उद्योग, पायाभुत सुविधा, कृषी व संलग्न क्षेत्रे, सामाजिक क्षेत्र आदींचे जाळे अधिक विस्तृत करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प महायुतीच्या सरकारने  मांडला आहे.

विशेष म्हणजे जल, जंगल, जमीन आणि प्राचीन संस्कृतीचे रक्षण करणा-या आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी या अर्थसंकल्पात भरीव वाढ करण्यात आली आहे. गत वर्षीच्या तुलनेत आदिवासी विकास विभागाच्या निधीमध्ये तब्बल 40 टक्क्यांनी वाढ करून यावर्षी 21495 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या धोरणात्मक निर्णयामुळे आदिवासी समाजाच्या सर्वांगीण उन्नतीला चालना मिळणार असल्याचे राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके म्हणाले.

०००००

जिल्ह्यात 12 व 13 मार्च रोजी उष्मा लाटेसंदर्भात ‘येलो अलर्ट’



 जिल्ह्यात 12 व 13 मार्च रोजी उष्मा लाटेसंदर्भात ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर, दि. 10 मार्च  : भारतीय हवामान खात्याकडून चंद्रपूर जिल्ह्यात एक दोन ठिकाणी 12 व 13 मार्च या दोन दिवसाकरिता उष्मा लाटेबद्दल सतर्कता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी याबाबत खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी केले आहे.

उन्हाळ्यामध्ये नागरिकांनी उष्ण लाटेपासून बचाव होण्याच्या दृष्टीने घ्यावयाची दक्षता :

काय करावे : पुरेसे पाणी प्या, शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखा. घराबाहेर पडतांना डोके झाकण्यासाठी टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा. दुपारी 12 ते 4 वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळावे. थेट येणाऱ्या सुर्यप्रकाशाला/उन्हाला अडविण्याकरिता घरातील पडद्यांचा वापर करावा. उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टिव्ही, किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा. हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.

काय करू नये : उन्हात अतिकष्टाची कामे करु नये. दारु, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नये. दुपारी 12 ते 4 च्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळावे. उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नये. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे, तसेच मोकळया हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी. चप्पल न घालता अनवाणी उन्हात चालू नये.

००००००

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरीता तात्काळ अर्ज नोंदणी करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरीता तात्काळ अर्ज नोंदणी करा

          चंद्रपूर, दि.10 मार्च :  मागासवर्गीय शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती तथा नवबौध्द घटकातील  इयत्ता 11 वी, 12 वी तसेच इयत्ता 10 वी, 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास, शैक्षणिक  सुविधेसाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यासाठी  शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केली आहे.

      सन 2024-25 पासून नव्याने कार्यरत झालेले ऑनलाईन पोर्टल हे शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरिता एकत्रित असल्याने  शासकीय वसतिगृहास  ऑनलाईन अर्ज करणाऱ्या, ज्या पात्र अनुसूचित जाती तथा नवबौध्द प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांची  गुणवत्ते अभावी निवड झालेली नाही, अशा विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन प्रणारीद्वारे स्वाधार योजनेकरिता ग्राहय धरले जाईल. तसेच नियमानुसार पुढील पडताळणीसाठी संबंधित  सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयाच्या लॉगिन वर अग्रेषित केले जातील. सदर माहिती पोर्टलवरील लॉगीनमध्ये विद्यार्थ्यांनी परिपूर्ण माहिती भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी सदर माहिती अपूर्ण भरल्यास सदर अर्ज अपात्र करण्यात येईल व त्यासाठी सर्वस्वी विद्यार्थी जबाबदार राहील, याबाबत नोंद घेण्यात यावी.

योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आवश्यक  कागदपत्रे : कास्ट सर्टिफिकेट, डोमसियल, राशन कार्ड, पॅनकार्ड, आधार कार्ड, बॅक पासबुक (आधार लिंक असलेले), उत्पन्न दाखला (वडील हयात नसल्यास आईचे जोडणे व वडिलाचे मृत्यु  प्रमाणपत्र जोडणे आवश्यक), 10 वी, 12 वी व मागील अभ्यासक्रमाच्या सर्व मार्कशीट , लिव्हिंग सर्टिफिकेट  (टी.सी.),   बोनाफईट सर्टिफिकेट (व्यावसाईक अभ्यासक्रम करिता),गॅप सर्टिफिकेट ( शिक्षणामध्ये गॅप असल्यास आवश्यक), विद्यार्थ्यांचे घोषणापत्र (नोटरी/ स्वयं घोषणापत्रासह), पालकाचे घोषणापत्र (नोटरी/ स्वयं घोषणापत्रासह), भाडेकरारनामा, महाविद्यालय महानगरपालिका हद्दीपासून 5 कि.मी अंतराच्या आतमध्ये असल्याबाबत किंवा नगरपरिषद/ नगरपालिकेच्या हद्दीमध्ये असलेबाबत महाविद्यालयाचे प्रमाणपत्र,  महाविद्यालयाचे सहामाही 75 टक्के उपस्थिती,  आवश्यक अभ्यासक्रम  करिता व्हॅलिडीटी प्रमाणपत्र.

अर्ज करण्याकरिता ऑनलाईन पोर्टल  https://hmas.mahait.org असून अंतिम दिनांक 15 मार्च 2025 आहे, असे सामाजिक न्याय विभागाने कळविले आहे.   

०००००

Friday, 7 March 2025

विविध विकास निर्देशांकात चंद्रपूरचा प्रथम क्रमांक


 विविध विकास निर्देशांकात चंद्रपूरचा प्रथम क्रमांक

Ø जिल्हाधिका-यांचा होणार सत्कार

चंद्रपूर, दि. 7 : चंद्रपूर जिल्हा प्रशासनाच्या उत्कृष्ट कार्याची दखल शासन स्तरावरून घेण्यात येत असून आता चंद्रपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. विविध विकास निर्देशांकात चंद्रपूर जिल्ह्याने राज्यातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

            सांख्यिकी विभागाकडे असलेल्या तपशीलाच्या आधारे पुणे येथील विख्यात ‘गोखले अर्थशास्त्र  संस्थेतर्फे’ विविध जिल्ह्यांच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यात आले. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्याने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या मार्गदर्शनात विविध विकास निर्देशांकात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या निर्देशांकाचे सादरीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार असून यावेळी पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य संजीव सन्याल हेसुध्दा उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांना गौरविण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे बालकांच्या संरक्षणासाठी अस्तित्वात असलेल्या विविध कायद्यांची चंद्रपूर जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी तसेच बाल संगोपन योजनेसाठी घेतलेला पुढाकार यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांना नुकतेच मुंबई येथे ‘बालस्नेही’ पुरस्काराने सन्मानित करण्यात होते.

            या विकास निर्देशांकात चंद्रपूरची आघाडी : कार्यात्मक एफआरयु (प्रथम संदर्भ युनीट्स्‍) चे प्रमाण (आरोग्य विभाग), गर्भवती महिलांमधील ॲनिमिक महिलांची टक्केवारी (आरोग्य विभाग), सबसिडी वितरणातील साधलेल्या टक्केवारीची प्रगती (कृषी विभाग), लक्ष्याच्या तुलनेत ड्रीप सिंचनासाठी डीबीटीद्वारे निधी प्राप्त करणा-या लाभार्थ्यांची टक्केवारी (कृषी विभाग), स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वार्षिक लेखा अहवालाची वेळेत प्रसिध्दी (चंद्रपूर महानगरपालिका), प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुलांची टक्केवारी (ग्रामीण विकास), सुधारीत स्वच्छता सुविधा असलेल्या कुटुंबाची टक्केवारी (ग्रामीण विकास), विशाखा तक्रारींची निस्तारणाची टक्केवारी आणि सुधारीत दुर्घटना स्थळांची टक्केवारी व सुधारणा करणे बाकी असलेली स्थळे (परिवहन विभाग) या निर्देशांकात चंद्रपूर जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.

००००००

पीएम अवार्डकरिता जिवती तालुक्याची प्राथमिक निवड

 

पीएम अवार्डकरिता जिवती तालुक्याची प्राथमिक निवड

Ø आकांक्षित तालुका कार्यक्रम

चंद्रपूर, दि. 7 मार्च : देशातील सर्वात मागासलेल्या भागातील नागरिकांचे जीवनमान सुधारणे हा आकांक्षित तालुका कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमांतर्गत एकूण पाच थीम व नऊ सेक्टर दिले आहेत. या नऊ सेक्टरमध्ये जिवती तालुक्याची उत्कृष्ट कामगिरी होत असल्याने आकांक्षित तालुका कॅटेगिरीमध्ये पीएम अवार्ड करिता जिवती तालुक्याची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.

आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत आरोग्यपोषणशिक्षणस्वच्छताकृषी आणि संबंधित सेवापेयजल आणि स्वच्छताआर्थिक समावेशनमूलभूत पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकास आदींचा समावेश आहे. भारत सरकारने 2024 च्या सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेसाठी पंतप्रधान पुरस्कार योजनेला मान्यता दिली आहे. सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेसाठी पंतप्रधान पुरस्कारांची रचना देशभरातील नागरी सेवकांनी केलेल्या अनुकरणीय कार्याची दखल घेण्यासाठीओळखण्यासाठी आणि त्यांना बक्षीस देण्यासाठी करण्यात आली आहे. 

या अनुषंगाने प्राधान्य क्षेत्रातील कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यांचा समग्र विकास या श्रेणीअंतर्गत पाच पुरस्कार प्रदान केले जातील. आकांक्षित तालुका कार्यक्रम या श्रेणीअंतर्गत पाच पुरस्कार तर केंद्रीय मंत्रालये/विभागराज्येजिल्हे यांच्यासाठी नवोपक्रम या श्रेणीअंतर्गत सहा पुरस्कार प्रदान केले जातील.

20 जानेवारी 2025 रोजी पंतप्रधान पुरस्कार पोर्टल सुरू करण्यात आले. 27 जानेवारी  ते 21 फेब्रुवारी 2025 पर्यंत नोंदणी आणि नामांकन सादर करण्यासाठी हे पोर्टल कार्यान्वित करण्यात आले. या अंतर्गत पीएम पुरस्कार पोर्टलवर 1588 नामांकने प्राप्त झाली. यात जिल्ह्यांचा समग्र विकास करीता 437 नामांकने, आकांक्षित तालुका कार्यक्रम करीता 426 नामांकने तर नवोपक्रम अंतर्गत 725 नामांकने प्राप्त झाली. यात आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत जिवती तालुक्याची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.

आकांक्षित कार्यक्रम सुरू झाल्यापासून एप्रिल ते जून 2023 च्या आधारावर प्रथम डेल्टा रँकिंग प्रदर्शित करण्यात आली होती. त्यात जिवती तालुक्याचा भारतातून 500 पैकी 290 वा क्रमांक होता. त्यानंतर मागील एका वर्षात सर्व विभागनीय काम केल्यानंतर सहाव्या डेल्टा रँकिंग नुसार जिवती तालुक्याचा क्रमांक संपूर्ण भारतामध्ये 500 पैकी 49 वा आहे. तसेच झोन फोर- पश्चिम विभाग यामध्ये 69 आकांक्षित तालुक्यांपैकी जिवतीचा पाचवा क्रमांक आहे.

०००००००

वनहक्क समिती सदस्यांना बांबु व्यवस्थापनाचे धडे

 

वनहक्क समिती सदस्यांना बांबु व्यवस्थापनाचे धडे

चंद्रपूर, दि. 7 मार्च : वनहक्क कायदा - 2006 अंतर्गत सामुहिक दावे मंजूर झालेल्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील क्रियाशील वनहक्क समिती सदस्याना सामुहिक वनहक्क उपजीविकेसाठी बांबूचा वापर आणि सी. एफ. आर. भागात ग्रामपंचायतीच्या जबाबदाऱ्या या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली यांच्यातर्फे वन अकादमी येथे आयोजित करण्यात आले आहे.

अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधनशिक्षण व प्रशिक्षण) तथा वन अकादमीचे संचालक एम. एस. रेड्डी यांच्या संकल्पनेतून हे प्रशिक्षण 10 टप्यात आयोजित केले आहे. ज्यातून चंद्रपूर व गडचिरोली मधील विविध क्रियाशील वनहक्क समितीच्या 300 सदस्यांना या प्रशिक्षणाचा लाभ देण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षणाचे एकूण तीन टप्पे पूर्ण झाले असून चौथा टप्पा नुकताच वन अकादमीमध्ये पार पडला.

यात नागभीड तालुक्यातील खडकीयेनोलीकोदेपारदेवपायलीसोनुली (खुर्द) व ब्रम्हपुरी तालुक्यातील खेडमक्तामेंडकीशिवसागर तुकूमकळमगावमालडोंगरीरामपुरीनवेगावजवराबोडी (मेंढा) अशा 13 क्रियाशील वनहक्क समितीतील 25 सदस्यांना हे प्रशिक्षण देण्यात आले. बांबू क्षेत्राचे  व्यवस्थापन व बांबू क्षेत्राला चालना देणारे एक मोठे भागधारक म्हणून या वनहक्क समित्या आहेत.  वनहक्क कायदाग्रामसभेच्या जबाबदाऱ्या व उत्तरदायित्वबांबू लागवड त्याचे व्यवस्थापनबांबूचे निष्कासन – विक्री आगार व्यवस्थापनबांबूचा मूल्यवर्धित उपयोग इ. महत्वाच्या विषयावर  विविध तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत हे  प्रशिक्षण देण्यात आले.

००००००

बांबू हस्तकलेच्या माध्यमातून मिळणार घुग्घुस येथील महिलांना रोजगार

 

बांबू हस्तकलेच्या माध्यमातून मिळणार घुग्घुस येथील महिलांना रोजगार

चंद्रपूर, दि. 7 मार्च : बांबू हस्तकलेच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांना रोजगार मिळावा, या उद्देशाने बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र (बीआरटीसी) चिचपल्लीतर्फे घुग्घुस येथील 40 महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. खाणबाधित क्षेत्रातील महिलांच्या कौशल्य विकासासाठी घुग्घुस येथे 15 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप नुकताच पार पडला.

अप्पर प्रधानमुख्य वनसंरक्षक (संशोधनशिक्षण व प्रशिक्षण) तथा वन अकादमीचे संचालक एम. एस. रेड्डी, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्लीचे संचालक अशोक खडसे, यांच्या मार्गदर्शनात आयोजित या प्रशिक्षणाच्या समारोपीय कार्यक्रमप्रसंगी बीआरटीसी केंद्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी ए.डी. मल्लेलवारवनपाल एस. एस.लाटकर,

हस्तकला निदेशक किशोर गायकवाडप्रशिक्षक सुनिता मोकासेकाजल निमकरलक्ष्मी मिटपल्लीवारप्रियंका पाल आदी उपस्थित होते. 

प्रशिक्षणाच्या समारोपीय कार्यक्रमात बी.आर.टी.सी. तर्फे महिलांसाठी वन अकादमी येथील बी.आर.टी.सी.कार्यशाळेतऔद्योगिक भेट आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये महिलांना बांबूचा मूल्यवर्धित उपयोगसंवर्धन व उत्पादन प्रक्रियाइत्यादी बाबत माहिती देण्यात आली. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना बांबू क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचे मनोगत प्रशिक्षणार्थी महिलांनी व्यक्त केले. सदर प्रशिक्षणाचे तांत्रिक मार्गदर्शन बी.आर.टी.सी. पर्यवेक्षिका योगिता साठवणे, डिझायनर अंतिक मल्लिकसंतोष बजाईत  यांनी केले.

००००००

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणाऱ्या व्यक्तींकरिता गट चर्चा

 

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणाऱ्या व्यक्तींकरिता गट चर्चा

चंद्रपूर, दि. 7 मार्च : जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पिपरे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणाऱ्या व्यक्तींकरिता गट चर्चा आयोजित करण्यात आली होती.

या चर्चेमध्ये तंबाखूचे सेवन करणाऱ्या व्यक्तींना व्यसन सोडण्याकरिता समुपदेशन करण्यात आले. तसेच तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे दुष्परिणाम, व्यसन सोडण्याकरिता युक्त्या याबाबत व्यक्तींशी हितगुज करून डॉ.संदीप पिपरे यांनी मार्गदर्शन व औषधोपचार केले. ज्या व्यक्तींनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन अगोदरपासून सोडलेले आहे, अशा व्यक्तींचे अनुभव कथन करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शक म्हणून डॉ. प्राजक्ता खेळकर उपस्थित होत्या. तसेच सदर चर्चेमध्ये एकूण 25 ते 30 स्त्री व पुरुष यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन तुषार रायपुरे यांनी केले. आयोजन मित्रांजय निरंजने (समुपदेशक) यांनी केले.

००००००

Thursday, 6 March 2025

जिल्हाधिका-यांकडून ब्रीज बंधारा व लिफ्ट इरिगेशनची पाहणी




 

जिल्हाधिका-यांकडून ब्रीज बंधारा व लिफ्ट इरिगेशनची पाहणी

चंद्रपूर, दि. 6 मार्च : 100 दिवस कृती आराखड्यांतर्गत जिल्हास्तरीय अधिका-यांनी आठवड्यातून किमान दोन दिवस क्षेत्रीय भेटीदरम्यान  केंद्र व राज्य शासनाच्या प्रकल्पांना भेटी देऊन कामाच्या प्रगतीची पाहणी करावी, अशा राज्य शासनाच्या सुचना आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी मुल तालुक्यातील मौजा चिरोली येथे ब्रीज बंधा-यांची तसेच लिफ्ट इरिगेशनची पाहणी केली.

 यावेळी मुलचे उपविभागीय अधिकारी अजय चरडे, तहसीलदार मृदुला मोरेजिल्हा जलसंधारण अधिकारी निलिमा मंडपे, गटविकास अधिकारी श्री. राठोड, चिरोलीच्या सरपंच मिनल लेनगुरे, कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे तसेच उपअभियंता सार्वजनिक बांधकाम व गावातील व्यक्ती उपस्थित होते.

पाहणी करीत असतांना जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी ब्रीज बंधारा दुरुस्तीबाबत जलसंधारण अधिकारी यांना सूचना दिल्या. तसेच चिरोली गावातील पाणीपुरवठा योग्यरितीने करण्या बाबत सरपंचांना सांगितले.

चिमढा येथे मानव विकास अंतर्गत गोडाऊनचे उद्घाटन : जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी मुल तालुक्यातील चिमढा येथील मानव विकास अंतर्गत गोडाऊनचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी संपूर्ण गोडाऊनची पाहणी केली. त्यानंतर गोडाऊन परिसरात वृक्षारोपण करून उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. तसेच नागरिकांनी सांगितलेल्या समस्यांची तात्काळ दखल घेऊन त्यांचे निराकरण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या.

००००००

सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी गौरवगाथा कार्यक्रम

 

सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी गौरवगाथा कार्यक्रम

चंद्रपूर,  दि. 6 मार्च :  सांस्कृतिक कार्य विभाग अनेक महापुरुषांचे जन्मशताब्दी वर्ष मोठ्या उत्साहात साजरे करून त्यांचे विचार नवीन पिढीपर्यंत पोहचविणच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशीष शेलार यांच्या संकल्पनेतून व सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनात मुंबईचे संचालक विभिषण चवरे यांच्या नियोजनाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी गौरवगाथा या कार्यक्रमाचे आयोजन एफ. इ. एस. महिला महाविद्यालय चंद्रपूर येथे करण्यात आले.

या कार्यक्रमास  विजय मोगरेप्राचार्य राजेश चिमणकर  यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.  याप्रसंगी शाहीर सुरेश जाधव व त्यांच्या संचानी  उत्तम कार्यक्रमाचे सादरीकरण केले. या कार्यक्रमासाठी  विद्यार्थी व प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००००

Wednesday, 5 March 2025

जिल्हाधिकारी रमले विद्यार्थ्यांसोबत, अंगणवाडी व आश्रमशाळेत संवाद





 

जिल्हाधिकारी रमले विद्यार्थ्यांसोबत, अंगणवाडी व आश्रमशाळेत संवाद

Ø अंधारी नदीवरील पुलाच्या बांधकामाची पाहणी

चंद्रपूर, दि. 5 मार्च : राज्य शासनाच्या सात कलमी कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी बुधवारी आश्रमशाळा तसेच अंगणवाडी येथे भेट देऊन चिमुकल्यांशी संवाद साधला. यावेळी चंद्रपूरचे तहसीलदार विजय पवार, एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी चंद्रपूर तालुक्यातील इंदपवार आदिवासी आश्रम शाळा बोर्डा येथे भेट देऊन आश्रमशाळेची पाहणी केली. तसेच विद्यार्थी व कर्मचारी यांचेशी संवाद साधला. तसेच आदिवासी आश्रम शाळा बोर्डा येथे सुरू असलेल्या नवीन बांधकाम इमारतीची पाहणी केली. विद्यार्थ्यार्थ्यांची अभ्यासाच्या प्रगतीबाबत चौकशी केली.

तसेच मौजा पाहामी येथील अंधारी नदीवर सुरू असलेल्या नवीन उडान पुलाची पाहणी करून जिल्हाधिका-यांनी बांधकामाबाबत आढावा घेतला. यावेळी त्यांनी अंधारी नदीपासून दीड किलोमिटर अंतरावर असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वसलेल्या पाहामी गावात जाऊन गावातील नागरीकांची भेट घेतली. सदर भेटीदरम्यान पहामी येथील अंगणवाडी केंद्रातील सेविकेशी व शिकत असलेल्या विद्यार्थ्याशी संवाद साधून व्यवस्थेचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी प्रथमच गावात आल्याने सर्व गावकरी भारावून गेले. यावेळी कोळसा ग्रामपंचायतीचे सरपंच माधुरी वेलादीपोलीस पाटील भिमराव सोयाम, अंगणवाडी सेविका माया सोयाम तसेच गावातील अन्य नागरीक उपस्थित होते.

००००००

त्रृटी असलेल्या अर्जाची त्वरीत पुर्तता करण्याचे आवाहन

 

त्रृटी असलेल्या अर्जाची त्वरीत पुर्तता करण्याचे आवाहन

Ø डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

चंद्रपूर, दि. 5 मार्च : शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु प्रवेश  न मिळालेल्या, तसेच निवासभोजन व अन्य सुविधांअभावी पुढील शिक्षण घेऊ शकत नसलेल्या अनु. जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांपैकी 11 वी, 12 वी तसेच 12 वी नंतरच्या व्यावसायिक / बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजननिवासशैक्षणिक  साहित्य व इतर आवश्यक सुविधा स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची अंमलबजावणी  करण्यात येत आहे.

शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून सदर योजनेचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने https://hmas.mahait.org/ या संकेतस्थळावर 15 जानेवारी 2025 पर्यंत स्विकारण्यात आले आहेत. सदर अर्जाची छाननी केले असता अनेक अर्जामध्ये त्रुटी असल्याचे निदर्शनास आले. त्रुटी पुर्ततेकरीता सदर अर्ज विद्यार्थी लॉगीनला  Revert/Send Back करण्यात आले आहे. विद्यार्थी लॉगीनला दिसत असलेल्या अर्जांची त्रुटी पूर्तता करून विद्यार्थ्यांने आपला अर्ज ऑनलाईन पध्दतीने तात्काळ परत सबमीट करणे आवश्यक  आहे. तसेच अर्जाची प्रत आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सहायक आयुक्तसमाजकल्याण  कार्यालयडॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चंद्रपूर येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत. ऑनलाईन अर्जासोबत सादर करण्यात येत असलेले सर्व कागदपत्रे हे स्पष्ट दिसणारे असावेत. तसेच ऑफलाईन कागदपत्रे हे विद्यार्थ्यांने स्व:साक्षांकीत (Self Attestd) असावेतअसे आवाहन सहायक आयुक्त, समाजकल्याण  विनोद मोहतुरे  यांनी केले आहे.

०००००

प्रियदर्शनी सभागृहासाठी कंत्राटी तत्वावर साऊंड व लाईट ऑपरेटरची आवश्यकता


 प्रियदर्शनी सभागृहासाठी कंत्राटी तत्वावर साऊंड व लाईट ऑपरेटरची आवश्यकता

 चंद्रपूरदि. 5 मार्च : जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या अधिनस्त असलेल्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहासाठी लाईटींग व साऊंड सिस्टीममधील साहित्य हाताळण्याचे किमान एक वर्षाचे ज्ञान/ अनुभव असलेल्या व्यक्तिची मानधन तत्वावर आवश्यकता आहे.

विविध व्यक्ती/ संस्थाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांसाठी प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहातील साऊंड सिस्टीम तसेच लाईट ऑपरेटींग  हाताळणेसदर साहित्याची देखरेख व जतन करणेतसेच वरिष्ठांनी  वेळेावेळी केलेल्या आदेशाचे पालन करणे आदी कामांकरीता कंत्राटी पध्दतीने मासिक  मानधन तत्वावर 11 महिन्याकरीता अस्थायी स्वरुपात साऊंड ऑपरेटर व लाईट आपॅरेटर यांची नियुक्ती करावयाची आहे.

तरी इच्छुक पात्र व अनुभवी व्यक्तिंनी आवश्यक कागदपत्रासह सहा. करमणुक  कर अधिकारीजिल्हाधिकारी कार्यालयचंद्रपूर येथे 5 ते 11 मार्च 2025 या कालावधीत कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावे. दिनांक 11 मार्च  नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

अस्थायी स्वरुपात कंत्राटी पध्दतीने भरावयाच्या पदास खालील अटी व शर्ती लागू राहतील.

1. अर्जदार हा चंद्रपूर मुख्यालयी राहणारा असावा. अर्जदाराची वयोमर्यादा 21 ते 50 पर्यंत असावी.  2. अर्जदारास लाईट व साऊंड  सिस्टीममधील साहित्य हाताळण्याचे किमान 1 वर्षाचे ज्ञान/ अनुभव असणे आवश्यक  आहे. तसेच विविध निमशासकीयखाजगी संस्था किंवा इतर ठिकाणी सदरबाबतचे अनुभव असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. 

साऊंड ऑपरेटर पदांकरीता 10500 रुपये व लाईट ऑपरेटर करीता 10 हजार रुपये पदाचे मासिक मानधन रुपये राहील. 4. निवड केलेल्या उमेदवारास सभागृहातील कार्यक्रम सुरु होणेपासून ते संपेपर्यंत सभागृहात उपस्थित राहणे  बंधनकारक राहील. 5. निवड केलेल्या उमेदवाराची नेमणूक जिल्हाधिकारीचंद्रपूर यांचे अधिकारात 11 महिन्याच्या कालावधीकरीता अगदी तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने करण्यात येईल. 6. सदर कालावधीत त्यांची सेवा असमाधानकारक आढळुन आल्यास त्यांना कोणतीही पूर्वसुचना न देता सेवा केव्हाही समाप्त करण्यात येईल. तसेच त्यांना कोणत्याही सेवाविषयक लाभाचा हक्क सांगता येणार नाही. त्याचप्रमाणे नवीन नेमणुकीचा हक्करजाभरपाईवैद्यकीय परिपुर्तीसेवाजेष्ठतासेवानिवृत्ती वेतन इत्यादि सवलती अनुज्ञेय राहणार नाही.

7. कंत्राटी तत्तवावरील नियुक्तींचा  सदर कालावधी संपल्यानंतर त्यांची सेवा आपोआप संपुष्टात येईल. 8. उमेदवाराची सेवा समाधानकारक वाटल्यास त्यांना पुढील कालावधीकरिता जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत कंत्राटी तत्त्वावर मुदतवाढ देण्याचे अधिकार. जिल्हाधिकारी यांनी राखुन ठेवले आहे. 9. नियुक्ती कालावधी संपण्यापूर्वी त्यांना सेवेचा त्याग करावयाचा असल्यास त्यांनी या कार्यालयास 1 महिन्याचे अगोदर लेखी नोटीस देणे आवश्यक राहील. तशी नोटीस त्यांनी सादर न केल्यास त्यांचे 1 महिन्याचे मानधन कपात करण्यात येईल. 10. नेमून दिलेली कामे तसेच जिल्हाधिकारी यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानूसार कामे करणे बंधनकारक राहीलअसे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

०००००

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व फ्रिशिप योजनेचे अर्ज 10 मार्चपर्यंत सादर करा


 मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व फ्रिशिप योजनेचे अर्ज 10 मार्चपर्यंत सादर करा

चंद्रपूरदि.5 मार्च : अनूसूचित जाती प्रवर्गातील ‍विद्यार्थ्याकरिता भारत सरकार शिष्यवृत्ती,  फ्रीशिपराजर्षी शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्तीव्यावसायिक पाठ्यक्रमास शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन  व अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना या पाच योजनांचे नविन  व  नुतनीकरणाच्या अर्जाची महाडीबीटी प्रणालीद्वारे स्वीकृती सुरू झाली आहे.

महाडीबीटी प्रणालीवर ज्या ‍विद्यार्थ्यांनी अद्यापही अर्ज नोंदणी केलेली नाही वा मागील वर्षातील अर्ज त्रुटी पुर्ततेकरीता विद्यार्थी स्तरावर प्रलंबित आहे, अशा अर्जदारास  त्यांचा अर्ज सादर करण्याबाबत महाविद्यालयाद्वारे वेळोवेळी  लेखी सूचना निर्गमित कराव्यात. तसेच‍ विहीत वेळेत विद्यार्थ्यांचे परिपुर्ण अर्ज सादर न केल्यास सदर योजनेच्या लाभापासून अर्जदार वंचित राहिल्यास याची  सर्वस्वी जबाबदारी अर्जदाराची राहील, याची विद्यार्थ्यांनी दखल  घ्यावी, अशाही सूचना देण्यात याव्या. तसेच महाविद्यालयाने प्रवेशित अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे 100 टक्के अर्जांची  नोंदणी  होईल या दृष्टिने प्रयत्न करावेत.

महाडीबीटी प्रणालीवरील द्वितीयतृतीय व चतुर्थ वर्षाकरिता शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे  नूतनीकरणाच्या अर्जाकरिता प्रथम प्राधान्य देऊन सदर अर्ज प्राचार्यांनी निकाली  काढावेत. प्रथम वर्षातील ज्या अभ्यासक्रमांचे संबंधित शैक्षणिक यंत्रणा/ विभागामार्फत महाविद्यालयांचे शैक्षणिक  शुल्क मंजुर झालेले आहे, अशा द्यमहाविद्यालयांनी नविन अर्ज निकाली काढण्याची कार्यवाही तात्काळ करावी. महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असलेल्या अर्जाबाबत सर्व दस्ताऐवजांची पडताळणीअभ्यासक्रम शुल्कआधार बँक लिंकस्थितीइत्यादि बाबींची खातरजमा सर्व  अर्ज 10 मार्च 20254 पर्यत  जिल्हा कार्यालयास तात्काळ पाठवावेत.

महाविद्यालय स्तरावर अर्ज प्रलंबित राहून विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी  जबाबदारी संबंधित प्राचार्य यांची राहिल, असे सहाय्यक आयुक्तसमाजकल्याण  यांनी कळविले आहे.

०००००