Search This Blog

Wednesday, 29 July 2026

‘पीएम श्री’ शाळांच्या धर्तीवर जिल्ह्यातील 30 शाळांचा होणार कायापालट

 ‘पीएम श्री’ शाळांच्या धर्तीवर जिल्ह्यातील 30 शाळांचा होणार कायापालट

चंद्रपूर, दि. 29 : ‘पीएम श्री’ योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्हयातील पहिल्या टप्प्यात निवड झालेल्या 18 व दुसऱ्या टप्प्यात निवड झालेल्या 12 अशा एकूण 30 शाळा उत्तम गुणवत्तेच्या दृष्टीने, इतर शाळांना मार्गदर्शक ठरतील, अशा शाळा विकसित करावयाच्या आहेत. पीएम श्री शाळामध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील शिफारशीच्या अनुषंगाने उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

           पीएम श्री योजना ही नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मुख्य सहा स्तंभावर आधारीत आहे. यात 1) अभ्यासक्रम अध्यापन शास्त्र पध्दती व मूल्यमापन 2) प्रवेश आणि पायाभूत सुविधा 3) मानव संसाधन व शालेय नेतृत्व विकास 4) समावेशन आणि लिंग समभाव 5) व्यवस्थापन, सनियंत्रण व प्रशासन 6) लाभार्थ्यांचे समाधान.

चंद्रपूर जिल्हयातील पीएम श्री शाळांना केंद्रस्तरीय, राज्यस्तरीय अधिकारी यांनी भेटी दिल्या आहेत. त्यानुसार सदर 30 शाळांना नागपूर बोर्डाचे विभागीय अध्यक्ष, शिक्षण उपसंचालक, डाएटचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी (प्राथ/प्रशासन अधिकारी), शिक्षणाधिकारी (माध्य), शिक्षणाधिकारी (योजना) जिल्हा परिषद, चंद्रपुर व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी/गटशिक्षणाधिकारी भेटी देऊन शाळांची तपासणी व मार्गदर्शन करणार असल्याचे उपशिक्षणाधिकारी विशाल देशमुख यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment