Search This Blog

Wednesday, 29 July 2026

विद्या समिक्षा केंद्र प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती बंधनकारक

 विद्या समिक्षा केंद्र प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती बंधनकारक

चंद्रपूर, दि. 29 : केंद्र व राज्य शासनाच्या धोरणानुसार महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती, विद्या समिक्षा केंद्र ऑनलाईन प्रणालीवरच नोंदविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या दैनंदिन उपस्थितीवर थेट नियंत्रण ठेवणे, उपस्थितीचे अचुक विश्लेषण करणे, आणि शालेय प्रशासनात पारदर्शकता वाढविणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. शिक्षकांनी उपस्थिती नोंदवितांना कोणत्याही तांत्रिक त्रुटी किंवा विलंब टाळण्यासाठी गुगल प्ले स्टोरवरून अधिकृत विद्या समिक्षा केंद्र ॲप  डाऊनलोड करून त्याचा वापर करावा.

इयत्ता 1 ली ते 12 वीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती स्वीप्ट चॅट या अप्लीकेशनमधील स्मार्ट उपस्थिती या बॉट द्वारे सर्व वर्गशिक्षकांनी नोंदवावी. सर्व 100 टक्के शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविणे अनिवार्य आहे. ज्याप्रमाणे शाळा सुरु झाल्यानंतर ऑफलाईन हजेरी लगेच भरण्यात येते, त्याचप्रमाणे ऑनलाईन उपस्थिती लगेच भरण्यात यावी.

मागील वर्षी  विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थितीमध्ये चंद्रपूर जिल्हा प्रथम क्रमांकावर होता. यावर्षी सुध्दा आपला जिल्हा प्रथम क्रमांक राहील, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यामुळे दररोज विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती नोंदविण्यात यावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment