Search This Blog

Tuesday, 18 November 2025

दिव्यांगांसाठी काम करणा-या संस्थांनी 30 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करावी


दिव्यांगांसाठी काम करणा-या संस्थांनी 30 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करावी

चंद्रपूरदि. 18 : दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणात नागरीकनागरी समाज संघटनासंस्था महत्वपूर्ण भूमिका बजावतातदिव्यांगांसाठी काम करणाऱ्या या संस्था नोंदणीकृत असणे आवश्यक आहेत्यामुळे ज्या संस्थांची नोंदणी झाली नसेल अशा पात्र संस्थांनी 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत नोंदणी करावीअसे  आवाहन करण्यात आले आहे.

दिव्यांग व्यक्ती हक अधिनियम, 2016 च्या कलम 49 ते 53 अनुसार दिव्यांगांच्या कल्याणविकासपुनर्वसन आणि सक्षमीकरण क्षेत्रात काम करणाऱ्या नागरी समाज संघटनासंस्थांची नोंदणी अनिवार्य आहेतथापि दिव्यांग क्षेत्रात अनेक नागरी समाज संघटनासंस्था वैध नोंदणी शिवाय कार्यरत आहेतसदर बाब दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2026 च्या कलम 50 चे उल्लंघन करणारी आहेत्यामुळे सर्व संस्थासंघटनांच्या कामकाजात एकसमानता येण्यासाठी तसेच त्यांची जबाबदारी आणि सेवांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यात आली आहेत्याअन्वये संघटनासंस्था यांच्या नोंदणीसाठी पात्रतेचे निकष ठरविण्यात आले आहे.

पात्रतेचे निकष : यात दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणविकास व पुनर्वसनासाठी संस्था कार्यरत असावीसोसायटी नोंदणी कायदा 1866, बॉम्बे पब्लिक ट्रस्ट कायदा 1950 किंवा कंपनी कायदा 2013 (कलम 8) अंतर्गत नोंदणीकृत असणे आवश्यक आहेनागरी समाज संघटनासंस्था दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 आणि केंद्र शासनाच्या दिव्यांग व्यक्ती हक्क नियम 2017 व महाराष्ट्र राज्य दिव्यांग व्यक्ती हक्क नियम नुसार पात्र असावी.

अशी करा नोंदणी : संघटनासंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे तसेच  स्वतःचे वित्तीय स्त्रोत असणे आवश्यक आहेनोंदणीसाठी अर्ज करतांना नोंदणी प्रमाणपत्रनोंदणी शुल्क प्रदान केलेल्या पावतीची प्रतवार्षिक अहवालमागील तीन वर्षातील सनदी लेखापरिक्षणवास्तुची माहिती सोबत जोडणे आवश्यक आहेअर्ज दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांच्या कार्यालयात 30 नोव्हेंबर पर्यंत सादर करावेअधिक माहितीसाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयजिल्हा समाज कल्याण विभागजि.चंद्रपूर येथे प्रत्यक्ष संपर्क साधावाअसे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जीसीयांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment