Search This Blog

Friday 15 September 2017

पुढील 2 वर्षात 50 कोटी वृक्ष लागवड करण्याचा वनविभागाचा निर्धार


चंद्रपूर,दि.15 सप्टेबर : महाराष्ट्रामध्ये पुढील दोन वर्षात 50 कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्टय ठेवण्यात  आले आहे. त्यामध्ये वन विभागाकडून  2017  मध्ये 4 कोटी , 2018 मध्ये 13 कोटी,  2019 मध्ये 33 कोटी असे  एकूण  50 कोटी  वृक्ष लागवडीचे नियोजन  करण्यात आले असून या अनुषंगाने जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक घेण्यात आली.  
यावेळी  जिल्हाधिकारी आशुतोष सलिल म्हणाले की, सन 2018 मध्ये आपल्या जिल्हयाला दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी पुढाकार घेवून आतापासूनच नियोजन करावे. जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसीच्या संकेस्थळावर चंद्रपूर जिल्हयात महसूल तसेच वन विभागाकडे असलेल्या झुडपी जंगलांची  माहिती  उपलब्ध केली जाईल. त्या झुडपी जंगलात सर्व शासकीय यंत्रणेला  वृक्ष लागवडीसाठी ते जंगल उपलब्ध करुन देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.  
या बैठकीत मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांनी सन 2017 मध्ये ज्या प्रमाणे सर्व शासकीय यंत्रणांनी वृक्ष लागवडीमध्ये मोलाचे सहकार्य केले. त्याचप्रमाणे यावर्षी सुध्दा सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी  वृक्ष लागवडीचे लक्षांक  पूर्ण करण्याचे आवाहन  करण्यात आले आहे.  या वर्षी चंद्रपूर जिल्हयाला दिलेले 74 लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पार करण्याचा संकल्प यावेळी या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी सचिन कंलत्रे, विभागीय वन अधिकारी अशोक सोनकुसरे, मुख्य व्यवस्थापक उत्तर राहुरकर, विभागीय व्यवस्थापक श्री.पाटील, मध्य चांदाचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे व इतर यंत्रणाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

     000000000

No comments:

Post a Comment