Search This Blog

Friday, 24 April 2026

2011 पुर्वीच्या अतिक्रमणधारकांना प्राधान्याने जागेचा मालकी हक्क द्या



 

2011 पुर्वीच्या अतिक्रमणधारकांना प्राधान्याने जागेचा मालकी हक्क द्या  

Ø पालकमंत्र्यांनी दिले यंत्रणांना निर्देश

चंद्रपूरदि. 24 : अनेक वर्षांपासून वास्तव्य असलेल्या अतिक्रमणधारकांना दिलासा देणारा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहेत्यानुसार 1 जानेवारी 2011 पुर्वी असलेले अतिक्रमण नियमानुकूल करून संबंधितांना जागेचा मालकी हक्क द्यायचा आहेया धोरणात्मक निर्णर्याची चंद्रपूर जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करून 2011 पुर्वीचा कोणताही पात्र लाभार्थी घराच्या / जागेच्या मालकी हक्कापासून वंचित राहणार नाहीयाची दक्षता घ्यावीअसे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉअशोक वुईके यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित बैठकीत ते बोलत होतेयावेळी आमदार देवराव भोंगळेआमदार करण देवतळेजिल्हाधिकारी वसुमना पंतमुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंहमनपा आयुक्त अकुनुरी नरेशनिवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभारउपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्रामसंदीप भस्के उपजिल्हाधिकारी (जमीनसचिन कुमावतअतुल जटाळे (पुनर्वसनयांच्यासह दूरदृष्यप्रणालीने सर्व उपविभागीय अधिकारीसर्व तहसीलदारगटविकास अधिकारीनगर पालिका आणि नगर पंचायतीचे मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.

अतिक्रमण नियमानुकुल करण्याची प्रक्रिया 2017 पासून सुरू झाली आहेअसे सांगून पालकमंत्री डॉवुईके म्हणालेयात सुधारणा करून अतिक्रमणधारकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने 25 मार्च 2026 रोजी अद्ययावत शासन निर्णय काढला आहेत्यानुसार 2011 पूर्वीच्या पात्र अतिक्रमीत लाभार्थ्यांना नियमानुकूल करून घराचा / जागेचा मालकी हक्क प्रदान करण्यात येईल.

ग्रामस्तरावरील यंत्रणेने यासाठी नागरिकांपर्यंत पोहचावेलोक आपल्याकडे येतीलयाची वाट पाहू नयेगावातील कोणताही पात्र लाभार्थी मालकी हक्कापासून वंचित राहणार नाहीयाची यंत्रणेने काळजी घ्यावीसर्व गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांना त्वरित सूचना द्याव्यातवनजमीन वगळता गायरान आणि महसुलीच्या जागेवर अतिक्रमण असेल तर नियमानुकूल करणे आवश्यक आहेअसेही पालकमंत्री डॉअशोक वुईके यांनी सांगितले.

            बळीराजा शेतपाणंद रस्त्यांचा आढावा : बळीराजा शेतकरी पाणंद रस्त्यासाठी स्थानिक आमदारांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहेआपापल्या क्षेत्रातील पाणंद रस्त्यांबाबत त्वरीत आढावा घेऊन किती किलोमीटरचे पाणंद रस्ते तयर करावयाचे आहेत्याचे नियोजन कसे केलेयाची माहिती द्यावीपावसाळ्यापूर्वी प्रत्येक मतदारसंघात पांदण रस्ते तयार व्हावेअशा सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.

०००००

No comments:

Post a Comment