ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ
चंद्रपूर, दि. 29 : ज्ञानभारतम् ही भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाची एक महत्वाची योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेनुसार भारतातील हस्तलिखीत वारशाचे सर्वेक्षण, दस्ताएवजीकरण, संवर्धन, डिजिटायझेन आणि प्रसार करणे हा आहे.
या अभियानअंतर्गत शैक्षणिक संस्था, संग्रहालये, ग्रंथालये आणि खाजगी संग्राहक यांच्या सहकार्याने देशभरातील हस्तलिखितांचा संग्रह करण्याचा केंद्र शासनाचा मानस आहे. सदर अभियान 16 मार्च, 2026 पासून हस्तलिखीत संग्रहाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
या अभियानात देवस्थान मंडळे, धार्मिक व धर्मदाय संस्था, शैक्षणिक संस्था, संग्रहालये, ग्रंथालये आणि खाजगी संग्राहक यांच्याकडे सन 1950 पुर्वीचे हस्तलिखीत ग्रंथ, लेख, लिखाण इत्यादी साहित्य असल्यास त्यांनी गुगल प्ले स्टोरवरून ज्ञानभारतम् (Gyan Bharatam) ॲप डॉउनलोड करावे. त्यामध्ये असे कोणत्याही भाषेतील हस्तलिखीत सांस्कृतिक, एतिहासीक, पुराणीक ग्रंथ, लेख, लिखाण माहिती अपलोड करावी. तसेच जिल्ह्यातील राज्य विद्यापीठे, ग्रंथालये, देवस्थान मंडळे, धार्मिक व धर्मदाय संस्था आदींनी यांना सर्वेक्षणात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
या संदर्भात अधिक माहितीसाठी https://gyanbharatam.com या संकेत स्थळाला भेट द्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी डि.एस. कुंभार यांनी कळविले आहे.
0000000
No comments:
Post a Comment