चंद्रपूर,दि 6 एप्रिल : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत सिनाळा येथे दिनांक 5 एप्रिलला गंगाधर वैद्य यांच्या रास्त भाव दुकानात अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती 5 किलो मोफत तांदळाचे वितरण करण्यात आले.
यावेळी सरपंच गीता वैद्य, उपसरपंच बंडू रायपुरे,ग्रामपंचायत सदस्या सरिता नडले, अश्विता रामटेके व इतर सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
यांचे उपस्थितीत कार्डधारकांना प्रतिव्यक्ती 5 किलो मोफत तांदळाचे वितरण करण्यात आले. यावेळी एकूण 167 अंत्योदय व 93 प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरण करण्यात आले.
अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत कोरोना (कोविड-19) विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्नयोजनेअंतर्गत राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र अंत्योदय अन्न योजना तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांसाठी प्रतिव्यक्ती 5 किलो तांदळाचे मोफत वितरण करण्यात यावे असे निर्देश दिलेले आहे.
00000
No comments:
Post a Comment